साधना सूत्रे

वैराग्य

[प्रवाचक - न्या. विनोद. रोहिणी दिवाळी अंक (१९६२), पश्यंती (२१)]

----------------------------------

''वैराग्याव्यतिरिक्त मानवी बुद्धीचा विकास शक्य असावा.``

हा एकच वर सैतानाने, नरकासुराने परमेश्वराजवळ मागितला, व मिळविला असावा.

आजच्या असुरी अणु-युगाची उभारणी ही सैतानाच्या विश्वविजयाची पताकाच होय.

विकसित पण विकार-दृष्ट बुद्धीच्या मायकुशीत जगातले सर्व अत्याचार, हिंसा, पापे व महायुद्धे यांचा जन्म होतो.

वैराग्यवृत्ती विकसित होत राहतो तर बुद्धीचा विकासही, इष्ट स्वरूपांत व प्रमाणांत अवश्य होत राहतो.

बुद्धीचा विकास झपाट्याने झाला तर, वैराग्याचीही वृद्धी होते, पण ती होईलच असा नियम नाही. किंबहुना, पहिल्या पहिल्या विकासाच्या अवस्थांमध्ये बुद्धि व वैराग्य यांच्यात तीव्र विरोधच असतो.

'रसवर्ज` (गीता) स्वरूपाचे वैराग्य, केवळ पुरूषार्थाने, पुरूष-प्रयत्नाने सिद्द होत नसते. वैराग्यशील सत्पुरूष व ईश्वरकृपा यांचा सहाय्य-हस्त असेल तरच, 'परवैराग्याच्या` मार्गावर पहिले पाऊल पडेल.

बुद्धी ही अनेक वेळा, वैराग्याची प्रदर्शने कशी करावी, सोंगे कशी आणावी, आत्मवंचना व पर-वंचना कशी करावी याचे मार्ग सुचविण्यांत पटाईत ठरते. पुस्तकी 'पढत` ही तर ख‍र्या वैराग्याशी सदैव 'लढत` करीत रहाते.

बुद्धीचे खरे कार्य म्हणजे वास्तवतेवर प्रकाश पाडते.

वासनांचे वास्तविक म्हणजे यथायोग्य यथायोग्य महत्त्वमापन करणे, ही बुद्धीची क्रियाशक्ती आहे.

पण केवळ वासनांच्या निष्ठेत विळविळणाऱ्या लंपट व लाचार जीवांना, जर परवैराग्याची एकदा, अगदी एकदाच रूचि मिळाली, चटक लागली तर, बुद्धीचे ठिकाणी असेलेली दिशाभूल करण्याची आसुरी शक्ती, पूर्णपणे विनष्ट होते.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search